Sunday, September 4, 2011

शहाणपण

प्रयत्न केल्याशिवाय आयुष्य सफल कसं होईल,
देवाने स्वत: जिंकायला युद्ध केली, त्याची नुसती भक्ती करून यश कसं येईल
मांजर आडवी गेली म्हणून परत फिरलात तर माणूस पुढे कसा जाईल,
ज्याचं नावच दु:खहर्ता, त्याची सोंड उजवीकडे असली तर तो दु:ख कसा देईल
मिळालं नाही यश तर नशीबातच नाही म्हणून प्रयत्न करणं सोडायचं नसतं,
आयुष्य आपलं, निर्णय आपले, प्रयत्नांनी नशीब बदलायचं असतं
लोकांना नाही आवडत म्हणून संस्कार विसरून वाहायचे नसते,
us कंपनीत गेलं की प्यायलाच लागते, असं म्हणून दारू, सिगारेट प्यायची नसते
सगळे करतात म्हणून मी करतो, असं म्हणून जगायचं नसतं,
जो सगळ्यात वेगळा असतो तोच प्रसिद्ध होतो, हे विसरायचं नसतं
संगतीनेच संस्कार बिघडतात, म्हणून वाईट सांगत ठेवायची नसते,
स्वत:च शहाणपण, सुबुद्धी जागरूक ठेवायची असते.....

No comments: